Monday, January 04, 2010

पळा पळा कोण पुढे पळे तो...

गौरी डबीर यांनी धनंजयची विदारक सत्य कथा  मुक्तपीठ मध्ये   सांगितली  आणि IT मधील ताण हा विषय पुन्हा चर्चेत आला. खरेतर 'ज्याच जळत त्यालाच कळतं' त्यामुळे बरेचसे IT मॅनेजर याकडे एक Incidence म्हणून सोडून देतील तसेच काहींना याची gravity सुद्धा कळणार नाही कारण काही मॅनेजर्सनी अशी परिस्थिती कधीही अनुभवलेली नसते किंवा अशी परिस्थिती आपल्यावर कधीच येणार नाही अशी त्यांची धारणा असते. परंतु धनंजयच्या घरची आणि मित्रांची जी अपरिमीत हानी झाली आहे ती शब्दांतून सांगताच येणार नाही. गौरी यांनी जी कळकळीची विनंती केली आहे ती खरोखरचं समजू शकतो पण वास्तव तितकेसे सोपे नसते.
१) IT मध्ये 'थांबला तो संपला' हेच ब्रिद आहे. अगदी ३ महिन्यात काहीतरी नविनच technology तुमच्या हातात दिली जाते आणि तुम्हाला अगदी कमी कालावधीत तो प्रोजेक्ट उभा करायचा असतो. आता यामध्ये कोणी कितीही realistic परिस्थिती सांगितली (प्रोजेक्ट वेळेत संपणार नाही आणि नवीन technology शिकायला वेळ लागेल),तरी वरच्या मॅनेजमेंट मध्ये कुणालाही त्या realistic गोष्टी ऐकायच्या नसतात (No one wants to hear the bad news). प्रत्येक IT कंपनीची अपेक्षा असते ती म्हणजे राक्षसी नफा कमीत कमी वेळेत मिळवणे. तो नफा कायमच प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांची पिळवणुक करुन मिळवला जातो. हे capitalistic (भांडवलशाही) अर्थव्यवस्थेचे सत्य आहे.
२) यात एखाद्याने धाडस करून सत्य वरच्या मॅनेजमेंटच्या घशी उतरवण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला  Negative,Incompetent,Non-Flexible असे शेरे मारून प्रवाहातून दुर फेकले जाते.
३) एखाद्याने धाडसी पाउल उचलून नोकरी सोडली तर त्याला दुसऱ्या ITनोकरीमध्येसुद्धा ह्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही याची काय खात्री ? (Its better to work with known DEVIL than unknown one )
४) एखाद्याने काही काळ विसावून नंतर नव्या दमाने यावे असा विचार केला तर त्याच्या विसाव्याच्या काळात technology इतकी बदललेली असते की त्याला नंतरच्या IT नोकरीत सगळेच नव्याने शिकावे लागते आणि त्याच्या स्पर्धेत नवतरुण असतात ज्यांची जास्त काळ थांबण्याची तयारी असते कारण त्यांच्यावर सांसारीक जबाबदारी अजून पडलेली नसते.
५) नोकरी सोडणे हे आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत तरी अजुनही संशयाने बघीतले जाते (Its a social stigma). यात त्या नोकरी सोडलेल्या माणसाचे नको इतके मानसिक खच्चीकरण होते आणि कधी-कधी त्याचा आत्मविश्वास नको इतका खालावतो. (career-break is unheard of in India).
६) बरे नोकरी सोडून नवीन काय करायचे हा एक गहन प्रश्न आहेच. वाढलेल्या वयात नवीन गोष्टी कमीत कमी वेळेत आत्मसात करून त्यात यश मिळवणे हे आहे ती नोकरी टिकवण्या इतकेच महत कार्य आहे (Its equally herculian task).
७) IT मध्ये सुद्धा काही कंपन्यांमध्ये काही customer-account मध्ये कामाचे स्वरुप इतके मोकळे-ढाकळे असते कि काही आजोबा-काका मंडळी त्या customer-account मध्ये असंख्य दिवस काढतात. पण असा सुखाचा 'कोपरा' मिळायला तुम्ही तितकेच नशिबवान असावयाला हवे आणि अशा mediocre work culture मध्ये दिवस काढायची तुमची मानसिकता हवी.
८) खरेतर आत्ताची तरुण पिढी एका फार मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे.(open economy, global market, ruthless competition, hire and fire work culture etc etc). इतर देशसुद्धा अशा स्थित्यंतरातून गेले आहेत पण यासाठी त्यांची पुर्ण पिढीच खर्ची पडली आहे. जपान हे उदाहरण अगदी अलिकडले आहे. यात किती कामगारांवर अन्याय झाला कितींची कुटुंबे अस्ताव्यस्त झाली याची खरी माहीती कुठल्याही सरकारी ठिकाणी मिळणे दुरापास्त आहे पण सत्य असे आहे की विकास (?) हा कशाच्यातरी मोबदल्याच मिळत असतो (Its always at the cost of something). आता याला खरा विकास म्हणायचे का हा एक चर्चेचा दुसराच मुद्दा आहे. आणि सरकार त्यासाठी वेगळे कामगार-संरक्षक कायदे बनवणार नाही.
शेवटी नाविलाजाने सांगायला लागते कि, गौरी यांच्या मतांशी मनातून अगदी १००% सहमत असून प्रश्न पडतो ' खरोखरीच आपल्या मनासारखे जगणे जगता येइल? खरोखरीच असे विसावता येइल?'

1 comment:

  1. मनासारखे "आनंदी" जगायचे असेल तर "आवडेल ते काम" याला प्राधान्य दिले पाहिजे. आजकाल किती मुलं आय टी ला आवड म्हणुन जातात ? कदाचित त्याचा परिणामही असु शकेल.
    पैसाच सगलं काही आहे असं जर मनावर बिंबवलं तर मग काय ? पळा पळा आणि पळा ...

    ReplyDelete

Your comment will be published shortly !!!