Wednesday, January 06, 2010

तीन वेडे



'थ्री इडियटस' हा 'चेतन भगत' यांच्या 'फाइव्ह पॉइंट समवन' या कादंबरीवर आधारीत चित्रपट सध्या जोरदार गर्दी खेचतो आहे.
खरेतर चित्रपटाचा संदेश सोपा आहे तो म्हणजे ' काबिलीयत बनाओ, कामयाबी अपने आप मिल जायेगी'. पालक आपल्या अपेक्षा मुलांवर लादतात आणि मुले या जगाच्या अनिर्बंध स्पर्धेत आपोआप खेचली जातात. मग त्यांना आपली नेमकी आवड, आपला कल, आपले छंद सगळेच विसरून 'ऐहिक' (materialistic) सुखाच्या शोधात सगळे आयुष्य खर्च करावे लागते. मी कोण (self identity) हे कित्तेकांना शेवट पर्यंत कळत नाही. मग वाटते 'ये जिनाभी कोइ जिना है लल्लु? '. पण प्रश्न असा पडतो कि, आपल्यापैकी किती जनांना आपल्या मनाचा कल कुठे आहे हे बरोबर समजते? समजा तो कल समजायला वयाची पन्नाशी आली तर 'आवडीचे' काहितरी करायला कोण धजावेल? त्यापुढे बरेचजण मग 'ठेविले अनंते तैसेची राहावे' म्हणून पुढची वाटचाल करतात.


कोणीतरी बरोबर म्हटले आहे ''convert your hobby into profession and you never have to work'. वॉलस्ट्रीट जर्नलला मुलाखात देतांना 'बिल गेटस'ला विचारण्यात आले की, 'एवढे मोठे साम्राज्य निर्माण करायचे तुझे स्वप्न अगोदर पासून होते काय? '. त्याचे उत्तरही तितकेच मार्मिक होते. तो म्हणाला 'नाही. मी फक्त तेच केले जे मला स्वतःला वापरायला आवडेल. ' आपली आवड एखाद्या मोठ्या धंद्याचे रुप घेइल हे त्याच्या गावीही नसावे. नामांकित हार्वर्ड विद्यापिठाला त्याने रामराम ठोकला यातच सर्व आले. स्टिव जॉब्ज (CEO of Apple) सुद्धा याच पठडितला. त्याचा 'Stay Hungry Stay Foolish' हा स्टॅनफर्ड विद्यापिठाच्या पदविदान समारंभात दिलेला संदेश खरोखरच संग्राह्य आहे.




आपल्या भारतात मात्र असे 'साहसी' प्रकार करणारे प्रमाणाने कमी आहेत. मेडिकल रिसर्चच्या एका निरिक्षणानुसार भारतीयांमध्ये हृ्दयविकाराची शक्यता ही पाश्चिमात्यांच्या तुलनेत तिप्पट जास्त असते. 'साहसी' क्रिडा प्रकारांमध्येसुद्धा भारतीय तुलनेने कमी असतात. मला वाटते याला कारणीभुत 'सामाजीक' जडणघडण आणि वैयक्तिक मानसिकता असावी. जर एखादा मनुष्य नोकरीवरून 'बेकार' झाला किंवा त्याला धंद्यात 'नादारी' पत्करावी लागली तर समाज किंवा सरकारतर्फे त्याला कुठलीही मदत मिळत नाही. पाश्चिमात्य देशांत ते तितकेच सहजतेने घेतले जाते (Its taken sportingly). मध्यांतरी रश्मी बंसल या लेखिकेने IIM-Ahemedabad मधून उत्तिर्ण झालेल्या आणि स्वतःच्या हिंमतीवर आयुष्यात वेगळी वाट चोखंदळणाऱ्या २५ लोकांवरती एक पुस्तक लिहिले. त्याचे शिर्षक आहे 'Stay Hungry Stay Foolish'. हे पुस्तकही तितकेच वाचणीय आहे.



तद्दन मसालेपटासाठी बदनाम असणाऱ्या 'बॉलिवुड' कडून एका विचार करायला लावणाऱ्या कलाकृतीची ('थ्री इडियटस') निर्मिती झाली हे ही नसे थोडके.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

4 comments:

  1. Sahi re Yogesh.....good blog buddy

    ReplyDelete
  2. Good one Yogesh! Keep up your blogs and we will get "man-mokala" to read. Thanks.

    ReplyDelete
  3. Hello yogesh,tumhi khupach chaan lihile ahe.waachun khup maja ali.keep it up.mi sudha Achyut siranchi fan ahe.

    ReplyDelete
  4. मिलिंद, मनोज, महेश, आपल्या प्रतिक्रियांबद्द्ल मनापासुन आभार !!!

    ReplyDelete

Your comment will be published shortly !!!